कृषी श्रमिक सामाजिक सुरक्षा योजना
कृषी श्रमिक सामाजिक सुरक्षा योजना 1 जुलै, 2001 रोजी लागू करण्यात आली.
या योजनेअंतर्गत 18 ते 15 वर्षे वयातील कृषी श्रमिकांचा समावेश केला जातो.
सुरुवातीस योजना 50 जिल्ह्यांमध्ये लागू करण्यात आली.
योजनेअंतर्गत कमीत कमी 20 शेतमजुरांच्या गटाचा विमा उतरविला जातो.
या योजनेअंतर्गत 60 वर्षांच्या आत विमाधारकाचा मृत्यू झाल्यास 20,000 रुपये व व्याजासहित जमा रक्कम, पूर्ण अपंगत्व आल्यास 50,000 रुपये, आंशिक अपंगत्व आल्यास 25,000 दिले जातात.
या योजनेअंतर्गत विमाधारकास प्रत्येक वर्षी 365 रुपये चा विमा हप्ता भरावा लागतो .
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
सामुदायिक विकास कार्यक्रम
योजनेची सुरुवात 2 ऑक्टोबर 1952
योजनेत कार्यवाही पहिली पंचवार्षिक योजना
लक्ष सामाजिक सोयीसुविधांमध्ये वाढ करणे
उद्देश
ग्रामीण भागातील कृषी पशुपालन ग्रामोद्योग आरोग्य उपचार व बालकल्याण इत्यादी क्षेत्रातील व्यक्तींच्या जीवन स्तरांमध्ये वाढ करणे
पहिल्या पंचवार्षिक योजनेत सामुदायिक विकास कार्यक्रम हा ग्रामीण विकास सेवेचे अंग मानण्यात आला.
🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀
संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना
योजनेची सुरुवात 25 सप्टेंबर 2001
योजनेत कार्यवाही नववी पंचवार्षिक योजना
लक्ष्य रोजगार निर्माण करणे
उद्देश ग्रामीण बेरोजगारीची चक्र मोडणे रोजगार बरोबर अन्न सुरक्षा पुरविणे पायाभूत सुविधा पुरविणे या उद्देशाने योजना सुरू करण्यात आली
या योजनेअंतर्गत रोजगार धारकांना पाच किलो धान्य व एकूण पगाराच्या 25 टक्के पगार रोख स्वरूपात दिला जात असून याची अंमलबजावणी जिल्हा पंचायत व ग्रामपंचायती मार्फत केली जाते.
🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀
ग्रामीण भूमिहीनांसाठी आश्वासित रोजगार योजना
योजनेची सुरुवात – 15 ऑगस्ट, 1983
योजनेत कार्यवाही – सहावी पंचवार्षिक योजना
लक्ष्य – रोजगार निर्मिती करणे
उद्देश – ग्रामीण भूमिहीनांना रोजगाराची हमी देणे, ग्रामीण राहणीमान सुधारणे व त्यांची खरेदी शक्ती वाढविणे, त्याचबरोबर ग्रामीण भागात उत्पादक असे प्रकल्प उभारण्याच्या उद्देशाने ही योजना सुरु करण्यात आली. ही योजना एप्रिल 1989 मध्ये जवाहर रोजगार योजनेत विलीन करण्यात आली.
🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀
विशेष घटनाक्रम :
1. 2 ऑक्टोबर 1975 रोजी पहिल्या 5 प्रादेशिक ग्रामीण बँका स्थापन करण्यात आल्या.
2. 1976-77 मध्ये दुसर्यांदा भारताचा व्यापारतोल अनुकूल ठरला.
3. 1976 मध्ये भारताचे पहिले राष्ट्रीय लोकसंख्या धोरण जाहीर करण्यात आले.
4. 1975-76 मध्ये बाल कल्याणासाठी एकात्मिक बाल विकास योजना (ICDS) सुरू करण्यात आली.
5. 1977-78 मध्ये वाळवंटी क्षेत्रामध्येपरिस्थिकीय संतुलन प्रस्थापित करण्यासाठी वाळवंट विकास कार्यक्रम (DDP)सुरू करण्यात आला.
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
उद्दिष्टे :
1. आर्थिक वाढ – लक्ष्य – 4.4%
2. दारिद्र्य निर्मूलन
3. उत्पादक रोजगारात वाढ
प्राधान्य :
1. शेती
2. उद्योग
3. इंधन / ऊर्जा
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
#Economics
राज्यसेवा पूर्व परीक्षा 2023
टॉप 20 प्रश्नांचा अतीसंभाव्य प्रश्नसंच: भाग 2
मार्गदर्शक : श्रीकांत सर
लिंक: https://youtu.be/mrF-yw9K_JI
Spardhagram App डाऊनलोड करा : https://bit.ly/39vTCfr
अधिक माहितीसाठी जॉईन करा @SpardhaGram
3. पतचलण निर्माण करणे
2. दुय्यम/अनुषंगिक कार्य –
बँकांवर असलेल्या दुय्यम कार्याचे वर्गीकरण प्रतिंनिधीक कार्य व सर्वसाधारण सेवा कार्य असे केले जाते.
A. प्रतिंनिधीक कार्य
B. सर्वसाधारण सेवा कार्य
💥💠💥💠💥💠💥💠💥💠💥
आवर्ती ठेवी –
दरमहा ठराविक रक्कम विशिष्ट मुदतीपर्यंत भरल्यास मुदतीअखेर व्याजासह ठेवी परत मिळते.
ठेवी-रक्कम दर महिन्याला वाढत जाते.
ठेवीवर बचत खात्यांपेक्षा जास्त मात्र मुदत ठेवीपेक्षा कमी दराने व्याज मिळते.
🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀
2. मुदत ठेवी –
या ठेवीत एक विशिष्ट मुदतीसाठी पैसे ठेवले जातात.
मुदत संपल्याशिवाय पैसे देण्याचे बंधन बँकेवर नसते.
मुदतपूर्व पैसे हवे असल्यास दंडात्मक व्याजदर आकारून ते पैसे दिले जातात.
💥🍀🍀💥💥🍀🍀💥💥🍀🍀💥
प्राथमिक कार्य – ठेवी स्विकारणे व कर्ज देणे यांना बँकांची प्राथमिक कार्य मानली जातात व तसेच त्यांना बँकेची आम्ल चाचणी कार्य मानली जातात.
🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀
सुट्टीचा कालावधी म्हणजे नेमके काय?
तिसर्या योजनेच्या अपयशामुळे व निर्माण झालेले आर्थिक अस्थैर्य, औद्योगिक क्षेत्रात शिथिलता आणि वित्तीय संसाधनांचा अभाव, या कारणांमुळे सरकारला चौथी योजना लगेच सुरू करता आली नाही. त्यामुळे सरकारला नियोजनाची नियमित प्रक्रिया स्थगित करावी लागली. या काळास योजना अवकाश किंवा योजनेला सुट्टी असे म्हणतात.
– ही सुट्टी 1 एप्रिल 1966 ते 31 मार्च 1969 दरम्यान राहिली.
– नियोजनाच्या सुट्टीच्या कळवधीदरम्यान मात्र सरकारने 3 वार्षिक योजना राबविल्या.
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
भारतीय बँक व्यवसायाची रचना –
भारतीय बँक-व्यवसायाचे वर्गीकरण खालील दोन भागांमध्ये करण्यात येते.
1. असंघटित बँक व्यवसाय
यामध्ये सावकार व सराफी पेढीवाले यांचा समावेश होतो.
उदा. भारतात पूर्वीपासून कर्ज व्यवहार करणारे महाजन, सेठ, श्रेष्ठ, शेट्टी, चेट्टियार, सराफ इ.
RBI ने सावकार व सराफ पेढीवाल्यांना संघटित क्षेत्रात आणण्याचे बरेच प्रयत्न केले असतांना सुद्धा ते या क्षेत्राचा पूर्ण हिस्सा बनू शकले नाही.
🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀
कृषी विकास योजनेअंतर्गत राज्यांची पात्रता
बाराव्या पंचवार्षिक योजनेमध्ये 2014- 15 करिता राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत राज्याची पात्रता निश्चिती करण्याकरिता पुढील दोन निकष निश्चित करण्यात आले
अ) राज्याच्या कृषी क्षेत्रावरील खर्च किमान प्रमाण आधारभूत फ्रेश एवढा राखणे
ब) सर्वकष जिल्हा कृती आराखडा व राज्य कृती आराखडा बनविणे.
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
जवाहर रोजगार योजना
योजनेची सुरुवात 1 एप्रिल 1989
योजनेत कार्यवाही सातवी पंचवार्षिक योजना
लक्ष रोजगार निर्मिती करणे.
उद्देश ग्रामीण पुरुषांनी स्त्रियांना अतिरिक्त रोजगार उपलब्ध करून गावामध्ये सामुदायिक साधन सामग्री निर्माण करणे त्याचबरोबर ग्रामीण जीवन स्तर उंचावणे.
केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या अंशी 20% आर्थिक सहभागातून ही योजना सुरु करण्यात आली
जवाहर रोजगार योजनेत राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजना आणि ग्रामीण भूमिहीनांसाठी आश्वासित रोजगार योजना समाविष्ट करण्यात आली.
🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀
संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना
योजनेत 1 एप्रिल 2002 रोजी आश्वासित रोजगार योजना व जवाहर ग्रामसमृद्धी योजना समाविष्ट करण्यात आली
संपूर्ण ग्रामीण रोजगार योजनेचा खर्च केंद्र सरकार व राज्य सरकार 75:25% प्रमाणात करतात
1 एप्रिल 2018 रोजी संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना ही राष्ट्रीय ग्रामीण रोजगार गॅरेंटी योजनेत समाविष्ट करण्यात आले
🍀🌼🍀🌼🍀🌼🍀🌼🍀🌼🍀
मूल्यमापण :
1. अशुभ सुरवात –1973 चातेलाचा झटका व चलन फुगवट्याच्या वाढत्या दरामुळे.
2. दरिद्रय निर्मूलन, बेरोजगारी, आणि स्वावलंबन या क्षेत्रांमध्ये अपयश.
3. मात्र योजनेच्या शेवटी अर्थव्यवस्थेत मोठ्या वाढीच्या दराची अपेक्षा निर्माण झाली होती.
4. 26 जुन 1975 – आणीबाणीची घोषणा
5. 1 जुलै 1905 – 20 कलमी कार्यक्रम.
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
कार्यक्रम :
TRYSEM – ग्रामीण भागातील तरुणांच्या स्वयंरोजगारासाठी प्रशिक्षण कार्यक्रम.
किमान गरजा कार्यक्रम –
1. दरिद्री रेषेतील कुटुंबांना मोफत व अनुदानित सेवा.
2. ग्रामीण व शहरी कामगारांची उत्पादक कार्यकक्षमता वाढविणे.
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
पाचवी पंचवार्षिक योजना
कालावधी : 1 एप्रिल 1974 ते 31 मार्च 1979
मुख्यभर : गरीबी हटाओ / दारिद्र्य निर्मूलन व स्वावलंबन
प्रतिमान : अॅलन मान व अशोक रुद्र
योजना खर्च : प्रास्ताविक खर्च – 37,250 कोटी रु व वास्तविक खर्च – 39,426 कोटी रु.
अपेक्षित वृद्धी दर – 4.4%
प्रत्यक्ष वृद्धी दर – 5%
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
B. कर्ज व अग्रिमे देणे –
बँका जमा केलेल्या ठेवींमधून निरनिराळ्या पद्धतीने कर्ज व अग्रिमे देतात व स्वतःसाठी नफा कमवितात.
ठराविक मुदतीसाठी कर्ज दिले तर त्याला कर्ज व अग्रिमे म्हणतात.
रोख पत रोख कर्ज
अधिकर्ष सवलत
तारणमूल्याधारित कर्ज
हुंड्याची वटवणी
🍀💥🍀💥🍀💥🍀💥🍀💥🍀
3. समिश्र ठेवी/बचाव ठेवी –
मागील देय व मुदत ठेवींच्या अटींचे एकत्रीकरण
यात केव्हाही व कितीही पैसे ठेवता येतात मात्र पैसे काढण्यावर बंधन असतात.बचत बँका अल्पावधीसाठी गुंतऊ शकतात, म्हणून बँका त्यावर अल्पदराने व्याज ठेवतात.
💠💠💠💠💠💠💠💠💠💠
A. ठेवी स्विकारणे-
1. मागणीदेय ठेवी/चालू ठेवी –
ज्या ठेवीचे पैसे मागणी करताच परत द्यावे लागतात त्यांना मागणीदेय ठेवी म्हणतात.
खात्यातून केव्हाही व कितीही रक्कम काढता व ठेवता येते.
खात्यावर धांनादेशाची सोय असल्यास त्यादवारे व्यवहार केला जाऊ शकतो
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
व्यापारी बँकांची कार्य
व्यापारी बँका लोकांकडून ठेवी स्विकारून त्याच ठेवीतुन गरजू लोकांना कर्ज देण्याचे प्राथमिक कार्य करतात.
बँक ही ऋणको व धनको अशी दुहेरी भूमिका बजावते.
🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀
संघटित बँक व्यवसाय
संघटित क्षेत्र हे RBI च्या नियंत्रणाखाली असून त्यात सार्वजनिक क्षेत्रातील, खाजगी क्षेत्रातील, सहकारी क्षेत्रातील तसेच, परकीय बँकांचा समावेश होतो.
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
भारतीय भांडवल बाजार –
वित्तीय व्यवस्थेच्या ज्या भागात मध्यम तसेच दीर्घकालीन निधींची देवाण-घेवाण होते, त्याला भांडवल बाजार असे म्हणतात.
भांडवल बाजारात 1 वर्षापेक्षा अधिक कालावधीचे कर्ज व्यवहार होतात. साधारणत: 5 वर्षापर्यंतच्या कालावधीला मध्यमकालीन तर त्यापेक्षा जास्त 20-25 वर्षापर्यंतच्या कालावधीला दीर्घ-कालीन समजले जाते.
भारतीय भांडवल बाजारात वित्त पुरवठा करणार्या व इतर वित्तीय सेवा प्रदान करणार्या संस्थांमध्ये खालील संस्थांचा समावेश होतो.
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹