141388
Here u can get all useful info about Geography & Agri for competitive exams. @eMPSCkatta @ChaluGhadamodi @Jobkatta @Marathi @MPSCEnglish @MPSCPolity @MPSCEconomics @MPSCHistory @MPSCScience @MPSCAlerts @SpardhaGram @MPSCMaterialKatta
🔹शोण नदी :-
------------------------------------
• उगम : अमरकंटक पठार (६०० मी)
• संगम : मनेर (पाटणा) येथे गंगा-शोण संगम.
• जोहिला, गोपत, रिहांद, कनहार आणि उत्तर कोयल.
-----------------------------------
t.me/MPSCGeography
🔹गंगा नदी :-
---------------------------------------------
• उगम :- उत्तराखंडात उत्तर काशी जिल्ह्यात गंगोत्री हिमनदीपासून (७०१० मी) भगीरथी आणि देवप्रयाग येथे अलकनंदापासून 'गंगा' नावाचा
प्रवाह.
• त्रिभुज प्रदेश :- प. बंगाल व बांग्लादेशात गंगा- ब्रम्हपुत्रा त्रिभुज प्रदेश.
• गंगेच्या प्रवाहाची निर्मीती : भगीरथी व
अलकनंदा नद्यांच्या संयुक्त प्रवाहास.
• भगीरथी : गंगोत्री हिमनदीची हिमगुहा.
• अलकनंदा : तिबेट सरहद्दीजवळ अलकनंदा शीर्षप्रवाहाचा उगम. विष्णुगंगा व धौलीगंगा यांचा एकत्रित प्रवाह.
• डावा किनारा : रामगंगा, गोमती, तमसा किंवा पूर्व तोन्स, घाघरा (शरयू), गंडकी, बुरी गंडक, कोसी, महानंदा.
• उजवा किनारा : यमुना ( उपनद्या चंबळ, सिंद, बेटवा, केन) ; शोण, दामोदर
-----------------------------------------
Join us @MPSCGeography
🔹दुधवा राष्ट्रीय उद्यान
उत्तर प्रदेशातील दुधवा राष्ट्रीय उद्यान वाघ आणि रेनडिअरसाठी जगप्रसिद्ध आहे. दुधवाचा उत्तर किनारा नेपाळसोबतच्या आंतरराष्ट्रीय सीमेला लागून असून, त्याच्या दक्षिणेला सुहेली नदी वाहते. दुधवात घनदाट हिरवेगार जंगल, उंच गवत आणि अनेक प्रकारचे वृक्ष आढळून येतात. हरणांच्या अनेक प्रजातींशिवाय वाघ, बिबट्या, रेनडीअर, हत्ती, कोल्हा, तडस आणि एकशिंगी गेंडा आदी प्राणी येथे आहेत. मोरासह पक्ष्यांच्या अनेक प्रजातींचेही हे वस्तिस्थान आहे. दुधवा हे उत्तर प्रदेशातील जैव विविधतेने समृद्ध असे सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान असून ते खिरी जिल्ह्यात आहे. १ फेब्रुवारी १९७७ साली दुधवा जंगलाला राष्ट्रीय उद्यान घोषित करण्यात आले. त्यानंतर १९८७-८८ मध्ये किशनपूर वन्यजीव क्षेत्राला दुधवात सामील करून याला व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा दिला गेला. दुधवात सरासरी १५०० मि.मी. पाऊस होतो. नोव्हेंबर ते फेब्रुवारीदरम्यान येथे कमाल तापमान २० ते २० अंश सेल्सिअस आणि किमान तापमान ४ ते ८ अंश सेल्सिअस असते. पहाटे धुके आणि रात्री थंडी पडते. मार्च आणि मेदरम्यान कमाल तापमान ३० ते ३५ अंश सेल्सिअस आणि किमान तापमान २० ते २५ अंश सेल्सिअससह वातावरण आल्हाददायक असते. जून ते आॅक्टोबर या काळात उन्हाळा असला तरी येथे मुसळधार पाऊस पडतो.
/channel/MPSCGeography/796
🔹महाराष्ट्रातील पर्वत शिखरे
शिखराचे नाव उंची(मीटर) जिल्हे
कळसूबाई 1646 नगर
साल्हेर 1567 नाशिक
महाबळेश्वर 1438 सातारा
हरिश्चंद्रगड 1424 नगर
सप्तशृंगी 1416 नाशिक
तोरणा 1404 पुणे
राजगड 1376 पुणे
रायेश्वर 1337 पुणे
शिंगी 1293 रायगड
नाणेघाट 1264 पुणे
त्र्यंबकेश्वर 1304 नाशिक
बैराट 1177 अमरावती
चिखलदरा 1115 अमरावती
जॉईन करा @MPSCGeography
महाराष्ट्र मानव विकास अहवाल
महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांचा मानव विकास अहवाल
आपण आता नदी व तिची भूरूपे पाहणार आहोत ....
संपूर्ण वाचण्यासाठी येथे क्लिक करा: /channel/MPSCGeography/599
आणखी माहितीसाठी जॉईन करा @MPSCGeography
🔹भारतातील प्रमुख जमाती
जमात राज्य
अबोर अरुणाचल प्रदेश
आपातनी अरुणाचल प्रदेश
आओ नागाल्यांड
अंगामी नागाल्यांड
कोल छत्तीसगढ
कोटा तामिळनाडू
मुंडा झारखंड
कोलाम आंध्र प्रदेश
छुतीया आसाम
चेंचू आंध्र प्रदेश
गारो मेघालय, आसाम, नागाल्यांड
बैगा छत्तीसगढ,झारखंड
भिल्ल राजस्थान, छत्तीसगढ
बदगा निलगिरी पर्वत तामिळनाडू
भोट हिमाचल प्रदेश
लेपचा सिक्कीम
वारली महाराष्ट्र
चकमा त्रिपुरा
गड्डी हिमाचल प्रदेश
जयंती मेघालय
बोदो आसाम
खासी आसाम, मेघालय, नागाल्यांड
गोंड महाराष्ट्र, झारखंड, छत्तीसगढ
लुशिया त्रिपुरा
मोपला केरळ
भुतिया उत्तरांचल
जारवा छोटे अंदमान
कुकी मणिपूर
कुरुख झारखंड, ओरीसा
अका,मिश्मी, अरुणाचल प्रदेश
डाफला अरुणाचल प्रदेश
कोरबा छत्तीसगड, महारष्ट्र
हो छोटा नागपूर
मुरीया बस्तर छोटा नागपूर
संथाल वीरभूम,झारखंड
गुज्जर हिमाचल प्रदेश
खोंड ओरिसा
मिकिर आसाम
उरली केरळ
मीना राजस्थान
ओरेओन पश्चिम बंगाल, झारखंड
तोडा निलगिरी पर्वत तामिळनाडू
Join us @MPSCGeography
जागतिक जलसाठा व उपलब्धता
जॉईन करा @MPSCGeography
भारतातील राज्यांची संख्याकी माहिती
नक्कीच तुम्हाला राज्यांची माहिती काढत असताना याचा उपयोग होईल.
🔹 यमुना नदी :-
• उगम :- उत्तरराखंडात उत्तर
काशी जिल्ह्यात जन्मोत्री हिमनदी
• संगम : गंगा & यमुनेचा संगम अलाहाबाद (प्रयाग)
• डावा किनारा : तोन्स, कार्वान, सेंगर
• उजवा किनारा : गिरी, बाणगंगा, चंबळ, सिंद, बेटवा, केन
• गंगा नदीची सर्वात लांब आणि महत्त्वाची उपनदी यमुना नदी. बहुतेक प्रवाह गंगेला समांतर.
-------------–-------------------
Join us t.me/MPSCGeography
भारतातील राज्यांचा निर्मितीनुसार क्रम.
@MPSCGeography
🔹तामिळनाडूतील सत्यमंगलम अभयारण्य
भारताच्या पश्चिम घाटात वसलेले तामिळनाडूतील सत्यमंगलम वन्यजीवन अभयारण्य आणि व्याघ्र प्रकल्प हे संरक्षित क्षेत्र आहे. सत्यमंगलमला २००८ मध्ये वन्यजीव अभयारण्य घोषित करण्यात येऊन २०११ मध्ये त्याची व्याप्ती वाढविण्यात आली. १,४११.६ चौरस कि.मी.चे क्षेत्र असलेले सत्यमंगलम तामिळनाडूतील सर्वांत मोठे अभयारण्य आहे. २०१३ मध्ये त्याला व्याघ्र प्रकल्प घोषित करण्यात आले. सत्यमंगलम उष्णकटीबंधीय शुष्क जंगल असून, ते पूर्व आणि पश्चिम घाटाला जोडते. २००९ मध्ये करण्यात आलेल्या प्राणिगणनेनुसार येथे १० वाघ, ८६६ भारतीय हत्ती, ६७२ गवे आणि २७ बिबटे होते. तथापि, २०१२ च्या गणनेत पंचवीसहून अधिक वाघ येथे दिसून आले. जगात सर्वाधिक आशियाई हत्ती येथेच आहेत. सत्यमंगलममध्ये हरणांच्या विविध प्रजाती असून, जंगली म्हशींचे कळपही आढळून येतात. या अभयारण्यात इलुगा आणि सोलिगा या दोन आदिवासी जमातींच्या वसाहती असून, मध आणि इतर वनसंपदेद्वारे त्यांचा उदरनिर्वाह चालतो. कुख्यात चंदनतस्कर वीरप्पनचे तस्करी साम्राज्यही याच जंगलात होते. तो हत्तींना मारून त्यांच्या दाताची तसेच चंदनाच्या झाडांची तस्करी करीत असे. प्रसिद्ध कन्नड अभिनेते राजकुमार यांचे अपहरण करणाऱ्या वीरप्पनने अनेकांची हत्या केली होती. २००४ मध्ये तामिळनाडू पोलिसांनी या क्रूरकर्म्याला ठार केले होते.
/channel/MPSCGeography/794
👆👆👆👆👆👆👆👆
लोकसंख्या भारतातील राज्ये व केंद्रशासित प्रदेश
उस्मानाबाद जिल्हा माहिती
By- पवनकुमार खोत
----------------------------------
जॉईन करा @MPSCGeography
भारतातील राज्यांची संख्याकी माहिती
नक्कीच तुम्हाला राज्यांची माहिती काढत असताना याचा उपयोग होईल.
⚱ ह्युमिक अँसिड ⚱
☘१५ कारणे का वापरावे पिकांसाठी ह्युमिक अँसिड☘
☘सेंद्रिय शेतीचे महत्त्व आता सर्वांनाच समजले आहे. परंतु हि शेती अधिक कार्यक्षम पद्धतीने कशी करु शकतो हे शेतक-याने जाणुन घेणे खुप महत्वाचे आहे. सेंद्रिय शेती अधिक फायदेशिर करण्यासाठी शेतीसाठी लागणारे आवश्यक घटकांचा म्हणजेच माती, पाणी, हवा यांचा अधिक प्रभावीपणे वापर कसा करता येईल ते पहाणे गरजेचे आहे. यासर्व घटकांचा पुरेपुर वापर करण्यासाठी ह्युमस /ह्युमिक अँसिडचा वापर करणे आवश्यक आहे. ह्युमिक अँसिडचा वापर करणे प्रत्येक शेतक-यासाठी अनिवार्यच झाले आहे.
☘ह्युमस /ह्युमिक अँसिड?☘
ह्युमस म्हणजे सेंद्रिय घटक म्हणजेच पालापाचोळा, जनावरांची विष्टा, शेतातील इतर सेंद्रिय पदार्थ यांच्या विघटनातुन तयार होणारा पदार्थ आहे. हा पदार्थ म्हणजे अनेक सेंद्रिय घटकांचे मिश्रण असुन हे पिकांच्य सर्वांगिण वाढीसाठी अतिशय आवश्यक आहे.
☘ह्युमिक अँसिडचे गुणधर्म☘
☘ह्युमिक अँसिड हे खत नसुन यात अतिशय अल्प प्रमाणात सुक्ष्म व मुख्य अन्नद्रव्ये असुन मातीचे भौतिक, रासायनिक व जैविक गुणधर्म सुधारणारे भुसुधारक आहे.हे मानवनिर्मीत नसुन पुर्णपणे नैसर्गिक पदार्थ आहे.ह्युमिक अँसिडमध्ये कार्बनचे प्रमाण अधिक असुन हायट्रोजन अतिशय अल्प प्रमाणात असतो. तसेच त्यात ४% पर्यंत नत्र असते.ह्युमिक अँसिड हे मुख्य करुन पावडर, दाणेदार स्वरुपात तसेच द्रवरुपातही वापरता येते.
☘ह्युमिक अँसिडचे फायदे ☘
☘ह्युमिक अँसिडमुळे मातीची रचना सुधारते तसेच पिकाची नत्र, स्फुरद, पालाश शोषण्याची क्षमता ही सुधारते.
☘मातीचा सामु स्थिर ठेवण्यास फायदेशिरनत्र स्थिरिकरण क्षमतेला चालना देऊन मातीतील नत्राची कमतरता भरुन काढते.ह्याचाच परिणाम त्या मातीतील पीक सशक्त व टवटवीत रहाण्यास फायदेशिर ठरते.
☘ह्युमिक अँसिडचा वापर केल्यास पिकांसाठी आवश्यक असणा-या बुरशींची वाढ होऊन ह्या बुरशीमुळे मातीपासुन उद्भवणारे रोगांपासुन संरक्षण मिळण्यास मदत होते.
☘ह्युमसयुक्त मातीमधील जलधारण क्षमता साधारण मातीच्या सातपट अधिक असते म्हणुनच दुष्काळयुक्त भागात ह्युमिक अँसिडचा वापर खुप महत्वाचा आहे.
☘जमिन हलकी होउन त्यात हवा खेळती राहते व मुळांची वाढ चांगली होते.याच्या वापरामुळे जमिनीतील स्फुरद, कल्शिअम, लोह यांचे उपलब्ध रुप तयार होते व पिकास हि अन्नद्रव्ये उपलब्ध स्वरुपात मिळतात.
☘बीजप्रक्रिया म्हणुन वापर केल्यास बियांची उगवण चांगली होण्यास मदत होते.
☘ह्युमिक अँसिडच्या वापरामुळे जिवाणुंना कार्बन पुरविला जातो व त्यामुळे जिवाणुंची संख्या वाढते.सोडियम व इतर विषारी रसायनांपासुन मातीवर होणारे दुष्परिणाम थांबवण्यास हे अतिशय उपयोगी पडते.
☘युरिया तसेच इतर रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे जमिन नापिक होण्यापासुन वाचवते.रासायनिक खतांची कार्यक्षमता ३०% पर्यंत वाढवते त्यामुळे खतांचा खर्च कमी येतो.
☘सर्वात महत्वाचे म्हणजे पिकांच्या पांढ-या मुळींची वाढ जलद होते.
🔹नागझिरा अभयारण्य
▪️निसर्गाला पडलेलं एक सुंदर स्वप्न म्हणून नागझिराच्या औचित्यपूर्ण गौरव केला जातो. जंगलात एक तळ असावं, तळ्याकाठी आज्ञाधारक रक्षाकाप्रमाणे उभे असणारे सरळ बुन्ध्यचे वृक्ष असावे, त्या वृक्षाचा प्रतिबिंब तळ्यात पडलेलं असावं. तळाच्या काठानें जाणारी वाट असावी, आजूबाजूला डोंगररांगा असाव्या, असे सारे कल्पनेत वाटणारे, प्रत्यक्ष पाहण्यासाठी नागझीरालाच जावे. रानात राहून या सर्व सौंदर्याचा आस्वाद घेण्यासाठी या अभयारण्यात आधुनिक दर्जाची निवासगृहे पर्यटकांच्या सेवेसाठी हजर आहेत.
▪️गोंदिया जिल्ह्यातील हे अभयारण्य पानझडी वृक्षाचे आहे.
✓तब्बल १५३ चौ.कि. मी. इतक्या मोठया क्षेत्रात पसरलेल्या या परिसरावर निसर्गाने आपले सगळे रंग मुक्तहस्ते उधळले आहेत.
✓या अभयारण्यात साग, अंजान, धावडा, ऐन, तिवस, सप्तवर्णी यांचे उंच वृक्ष आढळतात. शिवाय मोहफुले, चार, आवळा, बेहडा, तेंभूर्णी इ. फळझाडेही बघावयास मिळतात. अंगाचा ताठा कायम ठेवून आकाशाला भिडणारी बांबूची बेटे देखील नजरेस भुरळ पाडून जातात.
▪️वन्य प्राण्यांच्या अस्तित्वामुळे या अभयारण्याचे अरण्यपण अधिकच गडद होताना दिसते.
✓वाघ, बिबटे, रानगवे, चितळ, सांभर, नीलगाय, अस्वल इ. प्राणी इथे मुक्तपणे संचार करतात. येथील वनविभाग येणा-या पाहुण्यांच्या स्वागतासाठी नेहमीच तत्पर असतो. वनविभागाच्या वतीने जवळच्या पिटेझारी व चोर ख्म्बारा गावातील तरुणांना गाईड साठीचे प्रशिक्षण दिले गेले आहे.
✓आग टेहळणी बुरुजावरून लांबवर पसरलेल्या या अभयारण्याचे विहंगम अवलोकन करताना त्याचा विशालतेची व विशेषतेची खात्री पटते.
✓ शिवाय टायगर पॉईंट, बंदर चूवा पॉईंट, वाकडा वेहाडा, हत्ती खोदारा रोड अशी विविध ठिकाणी निसर्गाची निरनिराळी रूपे पहावयास मिळतात.
✓हे सारे निसर्गाचे सौंदर्य डोळ्यात साठवताना अक्षरशः कसरत करावी लागते. म्हणूनच महाराष्ट्रातील या वैविध्यतेने नटलेल्या अभयारण्याची वाट पुनःपुन्हा येण्यासाठी खुणावत राहते.
महाराष्ट्र राज्यातील प्रमुख खडक प्रकार...
जॉईन करा @MPSCGeography
भारतातील प्रमुख कोळसा व खनिज तेल क्षेत्रे
जॉईन करा @MPSCGeography